अभिनय क्षेत्राला धक्का! ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन; देशावर शोककळा

दिल्ली | गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. यात हॉलिवुड आणि बॉलिवूड या दोन्हीचा समावेश आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्याने अभिनय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यामुळे ही पोकळी कधी भरून निघणार? असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे. लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गज गायकांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने भारत सोडून इतर देशांमध्ये देखील शोक व्यक्त करण्यात आला होता.
एवढंच नव्हे तर पाकिस्तान मध्ये देखील त्यांच्या निधनाने मोठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. लता दीदी यांच्या नंतर अनेक दिग्गज देखील जगाला सोडून गेले आहेत. यात रमेश देव, बप्पी लहरी, सिद्धू मुसेवाला, केके या सारखे दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.
त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात अजून एक भर पडली आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या अभिनेत्याचे निधन झाले आहे.
पिटर स्टेपिंग पॉल रुफ असे त्या अभिनेत्याचे नाव होते. ते ९७ वर्षाचे होते. लंडन मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. १९८५ मध्ये युद्ध सुरू असताना. त्यांनी महाभारत हे नाटक केलं होत. हे नाटक तब्बल ९ तास चाललं होत.
विशेष म्हणजे हे नाटक कोणत्या रंगमंचावर झालं नव्हतं. तर ज्या ठिकाणी जागा मोकळी दिसेल, म्हणजे शाळा, ग्राउंड या ठिकाणी हे नाटक केलं जातं होत. हे नाटक प्रेक्षकांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होत. त्यानंतर अभिनय क्षेत्रात पिटर यांचा पाय खोलात गेला.
ते ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचे करोडोंच्या संख्येत चाहता वर्ग होता.