Falbag Anudan Yojana: फळबाग लावण्यासाठी सरकार देत आहे अनुदान; 90 टक्के अनुदानासाठी लगेच अर्ज करा

Bhausaheb Fundkar Falbag Anudan Yojana 2022

FalBag Anudan Yojana | नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही तुमच्यासाठी खास एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. होय तुमच्यासाठीच हो, चला तर जाणून घेऊयात की ती कोणती योजना आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. (Bhausaheb Fundkar Falbag Anudan yojana 2022)

तर फळबाग योजना ही त्यातीलच एक आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही योजना गेली तीन वर्षे कोरोणामुळे बंद करण्यात आलेली होती. पण आता ही योजना पुन्हा सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चला तर मग या योजनेच्या अटी कोणत्या, कोण लाभ घेऊ शकतो, तसेच  कोणत्या जिल्ह्यास ही योजना लागू आहे. याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. (Falbag yojana 2022)

कोरोनामुळें बंद झालेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना चालू करण्यात आली आहे. मागील 10 दिवसापूर्वीच या योजनेसाठी मान्यता मिळाली आहे. फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 104  कोटी रू निधी मंजूर केला आहे. भाजीपाला व पशुधन याबरोबरच फळबागा मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. या योजनेची सुरुवात 1990 सालापासून करण्यात आलेली आहे. ही योजना 5 एकर पेक्षा कमी शेत असलेल्यांना लागू करण्यात आलेली आहे. अल्पभूधारक यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. परंतु जॉब कार्ड धारक नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.  (Falbag Anudan yojana)

Advertisement

जिल्हा निहाय आर्थिक मंजुरी

    • ठाणे – 94 लाख 3400
    • पालघर – 1कोटी 07 लाख 74000
    • रायगड – 2 कोटी 12 लाख 44000
    • रत्नागिरी –  3 कोटी 29 लाख 96000
    • नाशिक – 5 कोटी 6 लाख 32000
    • धुळे – 1 कोटी 99 लाख 56000
    • नंदुरबार – 1कोटी 33 लाख 70000
    • जळगाव – 3कोटी 61 लाख 44000
    • पुणे – 5 कोटी 52 लाख
    • सोलापूर – 5 कोटी 87 लाख
    • सातारा – 4 कोटी 92 लाख 4900
    • सांगली – 3 कोटी 63 लाख  67000
    • कोल्हापूर – 3 कोटी 54 लाख 70000
    • औरंगाबाद – 3 कोटी 91 लाख 5000
    • जालना – 3 कोटी 26 लाख 4900

योजनेच्या अटी व पात्रता – 

Advertisement
  • कोकण विभागात १० गुंठे पासून तर अन्य विभात 20 गुंट्यापासून फळबागेची लागवड करता येईल.
  • जास्त शेती असेल तर वेगवेगळी फळझाडे लावता येणार आहेत.
  • मनरेगा लाभार्थीना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या पूर्वी जर लाभार्थीना लाभ मिळाला असेल तर परत लाभ मिळणार नाही.

 

येथे क्लिक करुन करा ऑनलाईन अर्ज

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *